धाराशिव (जिमाका)- सार्वजनिक वितरण प्रणालीतील सर्व रेशनकार्डधारकांची ई-केवायसी प्रक्रिया राज्य शासनाच्या निर्देशानुसार सध्या सुरू असून,केंद्र शासनाच्या २ मे २०२५ रोजीच्या पत्रानुसार ही प्रक्रिया ३० जून २०२५ पर्यंत पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. या तारखेनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही.तसेच,ज्या कार्डधारकांची ई-केवायसी पूर्ण झालेली नसेल,अशा कार्डधारकांना जुलै २०२५ पासून अन्नधान्याचे वितरण करण्यात येणार नाही,याची नोंद घ्यावी.ई-केवायसी करण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत:जवळच्या रेशन दुकानात जाऊन मोबाईल अॅपच्या माध्यमातून स्वतःऑनलाईन प्रक्रिया करता येईल. या प्रक्रियेसाठी केंद्र शासनाने “Mera e-KYC Mobile App” आणि “Aadhar Face RD Service App” सुरू केली आहेत.या अॅप्सचा वापर करण्याची पद्धत पुढीलप्रमाणे आहे. गुगल प्ले स्टोअरवरून दोन्ही अॅप्स डाऊनलोड करून इन्स्टॉल करा. “Mera e-KYC” अॅप उघडा,राज्य व ठिकाण निवडा.आधार क्रमांक टाका व आलेला OTP भरून सबमिट करा.माहिती पडताळा करून ‘Submit’ करा.नंतर ‘Face E-KYC’ वर क्लिक करून डोळे हलवत सेल्फी द्या. प्रक्रिया यशस्वी झाली की, ‘E-KYC पूर्ण’ असा संदेश दिसेल. तरी सर्व रेशनकार्डधारकांनी ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी व शेवटच्या तारखेची वाट न पाहता आपल्या कुटुंबाच्या अन्नसुरक्षेसाठी तत्काळ पावले उचलावीत,असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती स्वाती शेंडे यांनी केले आहे.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी