कृषि विज्ञान केंद्र,दुधबर्डी आणि सेंटर फॉर पिपल्स कलेक्टीव तर्फे आयोजित पशुपालक-शास्त्रज्ञ संवाद कार्यक्रमात प्रतिपादन
नागपूर – तांत्रीक ज्ञान आणि कौशल्यासह पुशपालकांना सक्षम करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जसे की, पशुधनाच्या पौष्टीक गरजा पूर्ण करण्यासाठी कुरण विकास, पिकाच्या उरलेल्या अवशेषांपासुन संपुर्ण खाद्याचे ठोकळे तयार करणे,चारा टंचाईच्या काळात काटेविरहीत निवडुंगाची हिरवी वैरण म्हणुन वापर करणे असे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.नितीन पाटील यांनी केले. महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठ अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र,दुधबर्डी,नागपूर आणि सेंटर फॉर पिपल्स कलेक्टिव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एकदिवसीय कार्यशाळा व पशुपालक-शास्त्रज्ञ संवाद कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.या प्रसंगी व्यासपीठावर संचालक,शिक्षण व अधिष्ठाता,पशुविज्ञान डॉ.शिरीष उपाध्ये,संचालक संशोधन डॉ. नितीन कुरकुरे,संचालक विस्तार शिक्षण डॉ.अनिल भिकाने, नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.आरजु सोमकुवर, सेंटर फॉर पिपल्स कलेक्टिव्ह चे संचालक सजल कुलकर्णी आणि अजिंक्य शहाणे,कृषि विज्ञान केंद्र,दुधबर्डी,नागपूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रा.डॉ.सारीपुत लांडगे आदी मान्यवर उपस्थित होते. गवळाऊ पैदासकार संस्थेचे अध्यक्ष पुष्पराज कालोकार, अमरावती जिल्हा गवळी समाजाचे अध्यक्ष खडके, उमरखेड येथील बंदी भाग विकास समितीचे अध्यक्ष बाबुसिंह जाधव,रबारी समाजाचे मशरु रबारी,भरवाड समाजाचे रामजी जोगराणा,रामटेक येथील महिला बतचगटासाठी पशुपालन प्रशिक्षणावर काम करणारे एकनाथ गजभिये व वराहपालन संस्थेचे अध्यक्ष विक्की बढेल यांना पशुसंवर्धन व पशुपालन क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. विविध पशुपालक समुहातर्फे संजय गायन,मशरु रब्बारी, संतोष गवळे,विक्रम परमार, रोहित खैरवार,प्रफुल्ल कालोकार,समीक्षा गणवीर, सजल कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.संचालक विस्तार शिक्षण डॉ.अनिल भिकाने यांनी शास्त्रोक्त पशुसंगोपनावर मार्गदर्शन केले. डॉ.संदीप चौधरी,डॉ.शिल्पश्री शिंदे आणि डॉ.शेखर बढे यांनी रेबीज आणि दुध जनजागृती अभियानासंबंधी मार्गदर्शन केले. डॉ.सारीपुत लांडगे यांनी प्रास्ताविक सादर केले तर कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन डॉ.श्वेता लेंडे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता डॉ.गजानन अंभोरे,डॉ.अतुल ढोक,डॉ. गितांजली ढुमे,आजिंक्य शहाणे, प्रवीण बागडे,इंजि.राजेंद्र सावरकर,मोहन कापसे,मोहन गौतम आणि गौरी भदोरिया यांनी अथक परिश्रम घेतले.सदर कार्यक्रमात मोठया प्रमाणात पशुपालकांनी सहभाग नोंदवला. ज्यामध्ये उमरखेड,मेळघाट,वर्धा, रामटेक,कुही,भिवापूर या भागातील विविध पशुपालक समाजातील 120 पशुपालक उपस्थित होते.
More Stories
पर्यावरण दिनानिमित्त माफसूच्या संचालनालय विस्तार शिक्षण येथे वृक्षारोपण
मानवी कल्याणासाठी युध्द नाकारणारा – सम्राट अशोक !
नमो किसान सन्मान निधी योजनेंतर्गत’ 3 हजार रुपये वाढून देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस