June 20, 2025

एहसास फाउंडेशनच्या इफ्तार पार्टीतून सामाजिक एकतेचा संदेश

  • कळंब – रमजान हा मुस्लिम धर्मीयांमध्ये पवित्र व रोजा ( उपवासाचा ) महिना आहे दिनांक २८ मार्च या महिन्यातील २७ वा रोजा होता या निमित्त संत ज्ञानेश्वर माऊली बालकाश्रम कळंब येथे एहसास फाउंडेशन सामाजिक संघटने च्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊली बालक आश्रमाचे संचालक महादेव महाराज अडसूळ यांनी सामाजिक सलोखा व भाईचारा वृद्धिंगत व्हावा यासाठी एक दिवसाचा रोजा उपवास पूर्ण केला. यानिमित्त आयोजित इफ्तार मध्ये हिंदू ,मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. इफ्तार नंतर आयोजित कार्यक्रमात महादेव महाराज अडसूळ यांचा एहसास फाउंडेशनच्या वतीने फाउंडेशनचे अमन मोमीन,अकीब पटेल, सुफी समशोद्दीन सय्यद यांनी पुष्पहार,बुके व शाल देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महादेव महाराज अडसूळ यांनी सर्व धर्मात मानव कल्याणाचे विचार सांगितले असून सामाजिक सलोखा तसेच गरजू लोकांना मदत करण्याचं महान कार्य एहसास फाउंडेशनचे अध्यक्ष अमन शेख व त्यांचे सहकारी करीत आहे. या कार्यक्रमातून सामाजिक गरजवंतांना मदत तसेच सहकार्याची व मानवतेची भावना मजबूत होईल असे सांगितले. याप्रसंगी मंचावर माजी नगराध्यक्ष यशवंत दशरथ,माजी उपनगराध्यक्ष प्रा.डॉ .बाळकृष्ण भवर, धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रा.डॉ. संजय कांबळे, कळंब तालुका पत्रकार संघाचे विश्वस्त सतीश टोणगे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी प्रा.डॉ. बाळकृष्ण भवर यांनी एहसास फाउंडेशन या सामाजिक संघटनेने सामाजिक एकता यासाठी सुरू केलेल्या कार्याचे कौतुक केले,व या विचारास बळकटी यावी यासाठी सर्व धर्मीयातून तरुणांनी पुढे येण्याची गरज प्रतिपादन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अकीब पटेल यांनी तर आभार अमर चाऊस यांनी मानले.
    या इफ्तार पार्टीमध्ये हिकमत मुलानी (उस्मानाबाद) सुफी समशोद्दीन सय्यद,हर्षद अंबुरे, निर्भय घुले,विलास करंजकर, मधुकर शीलवंत, सुभाष घोडके,बालाजी अडसूळ,राजेंद्र बिक्कड,महादेव खराटे,माधवसिंग राजपूत, शितल घोगडे,दीपक माळी,रमेश आंबिरकर,शिवाजी सावंत यांची उपस्थिती होती.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एहसास फाउंडेशनचे अध्यक्ष अमन शेख, वाजेद तांबोळी,अकीब पटेल,खदीम सय्यद,आदिल सय्यद, तोहफीक सय्यद, अरफान शेख यांनी परिश्रम घेतले.
error: Content is protected !!