June 22, 2025

सरकारने निष्पक्ष चौकशी करून योग्य निर्णय घ्यावा – राजाराम खरात

  • मुंबई – पत्रकार हे समाजाचे
    आरसे असतात आणि त्यांच्या माध्यमातून समाजातील विविध घटना,समस्या आणि घडामोडी लोकांपर्यंत पोहोचतात. अलीकडेच लय भारी यूट्यूब चॅनलचे पत्रकार तुषार खरात यांनी जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.या प्रकरणी सरकारने निष्पक्ष चौकशी करून योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे,असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आर के)अध्यक्ष राजाराम खरात यांनी केले.पत्रकारांना अटक करून समस्या सुटणार नाही. आपण लोकशाही देशात राहतो आहोत,आणि कोणत्याही पत्रकारावर अन्याय होऊ नये, असे राजाराम खरात म्हणाले. जर तुषार खरात यांनी काही चूक केली असेल,तर त्यांना योग्य शिक्षा मिळावी,परंतु त्यांच्या बाजूनेही न्याय होणे गरजेचे आहे.गोरे यांच्या संदर्भात त्यांनी जे सत्य उघड करण्याचा प्रयत्न केला आहे,त्याची सरकारने निष्पक्ष चौकशी करून योग्य निष्कर्ष काढावा,असे त्यांनी सांगितले.
    तुषार खरात यांच्या अटकेमुळे लोकशाहीत पत्रकारांच्या भूमिकेबद्दल प्रश्न उपस्थित झाले आहेत.पत्रकार हे लोकशाहीचा एक मजबूत आधारस्तंभ असून, सत्य आणि न्यायाच्या बाजूने उभे राहणे त्यांचे कर्तव्य आहे.गोरे यांच्या घोटाळ्यांचा पर्दाफाश करण्याचे कार्य तुषार खरात यांनी केले आहे,यासाठी त्यांच्या भूमिकेची योग्य दखल घेतली पाहिजे,असे राजाराम खरात यांनी नमूद केले.आंदोलन करणाऱ्यांचा हेतू लोकांपर्यंत त्यांचा आवाज पोहोचवणे हा असतो.मात्र,पोलिसांकडून आंदोलन करणाऱ्यांना अडथळे निर्माण करणे,त्यांच्या मोबाईल नंबर आणि नावे विचारणे हे दडपशाहीचे लक्षण आहे,असे खरात म्हणाले.अशा परिस्थितीत पत्रकारांनी एकत्र येऊन त्यांच्या सहकाऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे.पत्रकारांच्या एकतेमुळेच समाजात न्याय आणि सत्याचा मार्ग प्रशस्त होऊ शकतो.
    आजच्या परिस्थितीत पत्रकार परिषद घेण्यासाठी देखील आर्थिक अडचणी येऊ शकतात. मात्र,मित्रमंडळीत वकील असतील,तर त्यांच्या मदतीने योग्य कायदेशीर पाऊल उचलता येईल.सर्वांनी एकत्र येऊन या प्रश्नावर विचार करून योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे.
error: Content is protected !!