धाराशिव – येथे दिनांक 20/02/2025 रोजी दुपारी 1.00 वाजता व्हाईस ऑफ मिडिया लढा पत्र कारिता आणि अपघात विमा सुरक्षा कवच कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री ना.प्रतापराव सरनाईक हे होते.यावेळी भव्य कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र/ समाजभूषण संघाचे राज्यसचिव, कामगार नेते दलितमित्र शंकरराव खुने, समाजभूषण विजयकुमार गायकवाड,समाजभूषण अड. ज्योती बडेकर,समाजभूषण राजाभाऊ ओव्हाळ यांनी मागण्याचे निवेदन दिले त्यापुढील प्रमाणे 1) स्वातंत्र्य सौनिकाप्रमाणे दलितमित्र / समाजभूषण पुरस्कारार्थीना मानधन मिळावे. 2) पुरस्कारार्थीच्या कुटुंबीयांना महात्मा फुले जन आरोग्य योजनाचा शासनाने देण्याचे जाहिर केले होते, त्याप्रमाणे लाभ मिळावा कारण शासनाने दि. 29/09/2018 चे निर्णयाप्रमाणे राज्यभरातील पुरस्करार्थीची माहिती माहिती मागविलेली आहे. 3) पुरस्कारार्थीना परिवहनच्या सर्व बसेस म्हणून एक जोडीदार / सोबतसह विनामुल्य प्रवास सवलत लागू होती पण शासन गृह विभाग निर्णय दिनांक 09/10/2018 मध्ये पुरस्कारार्थी सोबत एक जोडीदार दर्शविलेले नाही. सदरचे शासन निर्णयावर शुद्धीपत्रक काढावे तसेच राज्याच्या बसेस जिथपर्यंत बाहेर राज्यात जातात तिथपर्यंत विनामुल्य प्रवास लागू करावा. 4) पुरस्कारार्थीना रेल्वे प्रवास मोफत सवलत मिळावी. 5) पुरस्कारार्थी शासनाचे / सामाजिक कामासाठी कार्यालयात जातात तेव्हा ते वयोवृध्द असल्याने त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे तसेच त्यांना सन्मानपूर्वक वागणूक मिळावी. 6) पुरस्कारार्थीना सामाजिक कामाचा अनुभव असल्यासने शासनाचे समिती / कमिटयावर अशासकीय सदस्य म्हणून काम करणेची संधी मिळावी. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी व इतर कार्यक्रमात समाजभूषण पुरस्कारार्थीना सन्मानपूर्वक बोलविण्यात यावे.
More Stories
मनाने मोठे… दिलदार मनाचे… संवेदनशील व्यक्तिमत्त्व-डॉ.प्रतापसिंह (भैय्यासाहेब) पाटील
उपशिक्षणाधिकारी दत्ताप्रसाद जंगम यांचा राष्ट्रीय ओबीसी अधिकारी महासंघाचे वतीने सत्कार
माजी सैनिक पाल्याकरिता अग्निवीर सैन्य भरतीची संधी