भारतीय इतिहासात अनेक लढायांनी देशाच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक आयुष्यावर परिणाम केला आहे. परंतु,काही युद्धे केवळ विजयासाठी नव्हे,तर सन्मान आणि स्वाभिमानासाठी लढली गेली आहेत.अशीच एक प्रेरणादायी घटना म्हणजे भीमा कोरेगावची लढाई १ जानेवारी १८१८ रोजी झालेल्या ऐतिहासिक लढाईत ५०० महार सैनिकांनी तब्बल २८ हजार पेशव्यांच्या सैन्याशी आपला स्वाभिमान आणि हक्क टिकवण्यासाठी लढा दिला आहे. भीमा कोरेगावची लढाई इंग्रज आणि पेशव्यांमधील सत्ता संघर्षाचा भाग होती.इंग्रज ईस्ट इंडिया कंपनी मराठ्यांविरुद्ध आपली सत्ता प्रस्थापित करू पाहत होती,तर पेशवे बाजीराव द्वितीय आपल्या साम्राज्याचे अस्तित्व वाचवण्यासाठी संघर्ष करत होते.या लढाईला सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने एक वेगळे महत्त्व आहे.पेशव्यांच्या राजवटीत दलित समाजाला,विशेषतः महार समाजाला,शोषण,अवमान आणि सामाजिक अन्यायाचा सामना करावा लागला होता.महारांना गावकुसाबाहेर राहण्यास भाग पाडले जात असे,त्यांच्या हक्कांवर गदा आणली जात होती आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर ठेवले जात होते.पेशव्यांच्या या अन्यायकारक व्यवस्थेविरोधात महार समाजाचा स्फोट लढाईच्या स्वरूपात झाला.इंग्रजांच्या सैन्यात भरती झालेल्या महार सैनिकांनी आपल्या सन्मानासाठी पेशव्यांच्या अत्याचाराविरुद्ध भीमा कोरेगावच्या रणांगणावर उभे ठाकले होते. ३१ जानेवारी १८१७ रोजी भीमा नदीच्या काठावर इंग्रज आणि पेशव्यांच्या सैन्याचे समोरासमोर लढाई झाली. २८,००० सैनिकांची बलाढ्य फौज, ₹ज्यामध्ये घोडदळ, तोफखाना,आणि पायदळ यांचा समावेश होता.पेशवे सैन्याचे नेतृत्व त्रिंबकजी डेंगळे करत होते. इंग्रजांकडे फक्त ८३४ सैनिक होते,ज्यामध्ये महार रेजिमेंटचे ५०० सैनिक महत्त्वाचे होते.इंग्रज सैन्याचे नेतृत्व कॅप्टन फ्रान्सिस स्टॉन्टन हे करत होते. महार सैनिकांनी या युद्धात आपल्या अद्वितीय शौर्याचे दर्शन घडवले.जरी पेशव्यांची सेना प्रचंड मोठी असली,तरीही महार सैनिकांनी रणांगणावर एक इंचही मागे न हटता लढा दिला. त्यांच्या रणनीती,दृढ निश्चय, आणि आत्मविश्वासामुळे पेशव्यांच्या बलाढ्य सैन्याला निर्णायक पराभवाचा सामना करावा लागला. लढाई तब्बल १२ तास चालली, परंतु महार सैनिकांनी आपला सन्मान राखत पेशव्यांच्या सैन्याला पळवून लावले. महार सैनिकांसाठी ही लढाई केवळ इंग्रजांसाठी लढण्याची नव्हती,तर पेशव्यांच्या राजवटीत झालेल्या सामाजिक अपमानाचा बदला घेण्यासाठी होती.त्यांनी या युद्धातून दाखवून दिले की, अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची ताकद सर्वांमध्ये असते.भीमा कोरेगावच्या विजयाने दलित समाजात स्वाभिमान जागवला.त्यांनी दाखवून दिले की त्यांच्याही अंगी पराक्रम आहे आणि ते कोणत्याही प्रकारच्या अन्यायाविरुद्ध उभे राहू शकतात. १ जाने १८१८ रोजीच्या पहाटे महार सैनिकामुळेच इंगजांनी ही लढाई जिंकली.या लढाईनंतर काही महिन्यांतच पेशवाईचा अस्त झाला आणि इंग्रजांनी मराठा साम्राज्य जिंकले. भीमा कोरेगावचा विजय हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसाठी व दलितांसाठी प्रेरणादायी ठरला. या लढाईने दलित समाजाला आत्मसन्मानाची भावना दिली, जी पुढे अस्पृश्यतेच्या विरोधातील चळवळीला बळकटी देणारी ठरली. या ऐतिहासिक विजयाचे स्मरण म्हणून भीमा कोरेगाव येथे विजय स्तंभ उभारण्यात आला.आजही १ जानेवारी रोजी लाखो लोक या ठिकाणी जमा होऊन महार सैनिकांच्या पराक्रमाला आदरांजली अर्पण करतात. ५०० महार सैनिकांनी २८,००० पेशव्यांच्या सैन्याशी दिलेली ही लढाई केवळ युद्ध नव्हते, तर ती मानवतेच्या सन्मानासाठी आणि स्वाभिमानासाठी दिलेली चळवळ होती.त्यांच्या या अद्वितीय शौर्याने सामाजिक विषमतेला विरोध केला आणि इतिहासात एक अमर उदाहरण निर्माण केले. भीमा कोरेगावच्या लढाईतील या वीरगाथेने दलित समाजाला संघर्षासाठी प्रेरणा दिली,जी आजही अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची शिकवण देते.महार सैनिकांनी दाखवले की,संख्या नव्हे,तर आत्मविश्वास,निष्ठा, आणि स्वाभिमान हा खरा विजयाचा मार्ग असतो. भीमा कोरेगाव संग्रामातील ५०० वीर महार सैनिकांना विनम्र अभिवादन आणि नवीन वर्षाच्या मंगलमय सदिच्छा..!
More Stories
“धाडस,विचार आणि सेवा यांचा संगम – पँथर अशोक कसबे” (वाढदिवस विशेष लेख)
अधिकारी व्हायचे असेल तर जि.प शाळेतच प्रवेश घ्या – उपशिक्षणाधिकारी दत्तात्रय लांडगे
छत्रपती संभाजी विद्यालयात प्रवेश उत्सव उत्साहात साजरा