भाटशिरपुरा – भाई नारायणराव लोमटे माध्यमिक विद्यालय भाटशिरपुरा व कृषी विभाग कळंब यांच्या संयुक्त विद्यमानाने भाट शिरपुरा येथील नदीवर वनराई बंधारा विद्यार्थ्यांच्या, शिक्षकांच्या,कृषी विभागाच्या सहाय्याने वनराई बंधारा करण्यात आला. यावेळी वनराई बंधाऱ्याचे फायदे तालुका कृषी अधिकारी भागवत सरडे यांनी सर्व विद्यार्थ्यांना सांगितले.तसेच यावेळी कृषी पर्यवेक्षक भुजंग लोकरे,कृषी सहाय्यक चंदनशिव, संस्थेचे सचिव बाळकृष्ण धस, मुख्याध्यापक सुरेश टेकाळे शाळेतील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सर्वांनी वनराई बंधारा उभारण्यासाठी परिश्रम घेतले. वनराई बंधारा उभारल्यानंतर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना कृषी विभागातर्फे केळी वाटप करण्यात आल्या. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहशिक्षक एस.जी.सूर्यवंशी यांनी केले.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी