June 21, 2025

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा

  • कळंब – भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने दि.१२ ऑक्टोबर २०२४ रोजी अशोक विजयादशमी तथा ६८ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शहरातील समता नगर येथील तथागत बुद्ध विहार येथे सकाळी ९.३० मिनिटांनी पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात येऊन विहारात सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. महिला,युवक व आबालवृद्ध यांना २२ प्रतिज्ञांचे सामूहिक वाचन करण्यात येऊन अंधश्रद्धेतून बाहेर यावे तसेच आजचा विद्यार्थी अभ्यासापासून दूर जाऊन मोबाईलच्या आहारी गेलेला आहे,तर बरेचसे पालक व्यसनाच्या अधीन झाले असून आई नावाचा पालक नवरात्राचा उपवास करीत अनवाणी पायांनी दारोदार जोगवा मागत फिरत आहे.समाजातील नेते शेळी होऊन लांडग्याच्या कळपात शिरले आहेत.नोकरदार गाडी,माडी, साडी,आणि ताडी यामध्ये गुंग झाले असून त्यामुळेच आजचा विद्यार्थी दिशाहीन झालेला आहे.म्हणून आई-वडील नोकरदार आणि नेते यांच्या समाजाप्रती संवेदनक्षम व सकारात्मक भूमिका हव्या आहेत. अशा प्रकारचे प्रवचन भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संस्कार सचिव लक्ष्मण धावारे यांनी केले.धम्म ध्वजा रोहन मेजर रमेश कांबळे यांनी करून या दांपत्यांनी विहारास खुर्च्या दान दिल्या.सामूहिक बुद्ध वंदना घेतली.याप्रसंगी महिला शाखेचे अध्यक्ष भाग्यश्री टोपे, सचिव ऋतुजा जगताप, कोषाध्यक्ष सुशीला गजधने, उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्वाती धावारे,सुकेशनी सावंत,आशा धावारे ,पूजा हौसलमल, नागरबाई वाघमारे,मंगल धावारे,जयश्री वाघमारे,नीलिमा सावंत,लक्ष्मीबाई गरड,शोभा साखरे, तारामती कसबे,जयश्री गाडे, विमलताई सोनवणे,लताबाई आव्हाड,तारामती कसबे, आम्रपाली गाडे, जयराम वाघमारे, अमोल गरड, महेंद्र रणदिवे ,डॉ एस.एम.कांबळे, सुखदेव गायकवाड,अरविंद आव्हाड, महादेव टोपे,लखन गायकवाड,दयानंद सावंत,चंद्रकांत कांबळे,व समता नगर मधील सर्व युवक महिला शाखेचे सर्व पदाधिकारी यांनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमासाठी तालुक्यातील सर्व ग्राम शाखेचे अध्यक्ष सचिव कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
error: Content is protected !!