धाराशिव – अफगाणिस्तान व इतर देशातून कांदा आयात करणे तात्काळ थांबविण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे केली आहे. या पत्रकार दुधगावकर यांनी म्हंटले आहे की, मागील वषार्पासून निर्यातीवर वेगवेगळे निर्बंध लादले होत. कांदा निर्यातीवर ४० टक्के निर्यात शुल्क व ५५० डॉलर्स किमान मूल्य या अटी लागू करून निर्यात बंदी सरकारने हटवली होती. ज्यामुळे शेतकऱ्यांना कांद्याचे चार पैसेही मिळाले नाहीत. कांदा उत्पादक शेतकरी कर्जबाजारी झाला. केंद्र सरकारने ४० टक्के निर्यात शुल्क व ५५० डॉलर्स किमान निर्यात मूल्य हे तात्काळ हटवून कांद्याची संपूर्ण निर्यात बंदी उठवावी. ज्यामुळे शेतकºयांच्या कांद्याला योग्य दर मिळेल व शेतकरी कर्जबाजारी होणार नाही. तरी याबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन संबधितांना आदेशित करावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे केली आहे.
More Stories
अखिल भारतीय महापशुधन एक्स्पो २०२६ च्या लोगोचे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते अनावरण
निवडणुकीत ७ लक्ष ४७ हजार ३७० मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन