June 23, 2025

जनसुरक्षा विधेयक तात्काळ रद्द करण्यासाठी भारत जोडो अभियानचे निदर्शने

  • संभाजीनगर – लोकशाही व मानवी हक्कांसाठी लढणाऱ्या संघटना व कार्यकर्त्यावर अंकुश ठेवून जन चळवळी दडपण्यासाठी जनसुरक्षा विधेयक सरकार आणू पहात आहे, त्याचे निषेधार्थ भारत जोडो अभियान दि.१८ जुलै २०२४ रोजी विभागीय आयुक्त कार्यालयावर तीव्र निदर्शने करून राज्यपालांसाठीचे निवेदन विभागीय उपायुक्त मिनियार यांना देण्यात आले.
    भारत जोडो अभियानाचे जिल्हा समन्वयक साथी भाऊसाहेब पठाडे यांनी प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धी पत्रकात पुढीलप्रमाणे मागण्या केल्या आहेत.
    आपल्या नागरी,न्याय्य व लोकशाही हक्कासाठी शेकडो चळवळींचे मार्फत हजारो कार्यकर्ते संघर्ष करीत आहेत. सर्व चळवळी कायद्याने चौकटीत राहून शांततेच्या मार्गाने आपले प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करतात, पण सरकार व प्रशासकीय व्यवस्था कायदेशीर प्रश्न ही वर्षानुवर्ष सोडवित नाही असा अनुभव असताना,न्याय्य मागण्या व हक्कासाठी आग्रह धरणाऱ्या वर जर या विधेयक/ कायद्याचा बडगा उगारून,आंदोलन दडपण्यासाठी या कायद्याचा दुरुपयोग केला जाणार असल्याचे,सदरील विधेयक तात्काळ मागे घ्यावे अशी मागणी आहे.
    तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड परिसरात अतिक्रमणाच्या नावाने गेले ४ दिवस ज्या प्रकारे गुंडगिरी सुरू आहे आणि पोलिसांसह प्रशासन ज्या प्रकारे बघ्याची भूमिका बजावित आहे,त्याचाही या वेळी निषेध कऱण्यात आला.
    संविधान विरोधी जनसुरक्षा विधेयक तात्काळ मागे घ्या, विशाळगड येथील हल्ल्याची न्यायालयीन चौकशी करा, राज्यात कोठेही सामाजिक तणाव वा दंगली झाल्यास त्यास पोलिस पाटील,सरपंच,तलाठी, ग्राम सेवक आणि जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व पोलीस प्रमुखांना जबाबदार धरा व त्या सर्वांना तात्काळ बडतर्फ करा, प्रत्येक गाव – वस्ती – वॉर्डात दक्षता ( मोहोल्ला..) समित्या गठीत करावे, सर्व शेतीमालास किमान हमी भाव निश्चीत करून त्यास कायद्याने संरक्षण द्या,उदरनिर्वाहासाठी केलेली सरकारी ( गायरान – जंगल) जमिनीवरील सर्व अतिक्रमण तात्काळ नियमित करा, निवडणुकीवर डोळा ठेवून कोणतीही ( लाडकी बहीण/ भाऊ वा अन्य…) योजना जाहीर करू नका,सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे वाढत असलेल्या महागाई व बेकारीमुळे आणि होत असलेल्या आर्थिक पिळवणूकीतून थोडासा दिलासा मिळावा म्हणून, कायमस्वरूपी व कायद्याने महिना ५ हजार रुपये हक्क म्हणून तात्काळ सुरू करा,केंद्र सरकारने ज्या ८१ कोटी लोकांना मोफत धान्य सुरू केले आहे,त्यांना तरी तात्काळ या योजनेचा लाभ सुरू करावा,सर्व कष्टकऱ्यांना त्यांचे म्हातारपण सन्मानजनक जगता यावे म्हणून तात्काळ ५ हजार रुपये महिना पेन्शन सुरू करा,माथाडी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करून, हा कायदा सर्व असंघटित व असुरक्षित कष्टकऱ्यांना लागू करा, शांततेत पार पडलेल्या या निदर्शनात साथी सुभाष लोमटे,प्रा.एच.एम्.देसरडा, ऍड. सुभाष सावंगीकर,प्रा. श्रीराम जाधव, मेराज सिद्दीकी, अड. अभय टाकसाळ, साथी भाऊसाहेब पठाडे, सुबेदार मेजर सुखदेव बन, साथी शेख खुर्र्म , साथी छगन गवळी, साथी अली खान, साथी सर्जेराव जाधव, साथी जगन भोजने, साथी शिवाजी राऊत इ. चा प्रमुख सहभाग होता.
error: Content is protected !!