मांडवा ( सुदर्शन देशमुख ) – धाराशिव जिल्ह्यातील मांडवा गावातील अतिक्रमण काढण्यासाठी टाळाटाळ होत असल्याचा प्रकार समोर आला आहे . या गावा मध्ये अनाधिकृत बांधकाम केले आहे, तसेच बस सँड वरील असलेल अतिक्रमण तसेच ग्रामपंचायती हद्दीतील दुकाने, टपर्या , हॉटेल, गाळेधारक , तसेच अन्य भाडेधारक या सर्व गोष्टी मुळे वाहनांना होणारा अडथळा, वाहतुकीमुळे होणारी गर्दी त्यामुळे नागरिकांना होणारा त्रासाची दखल ग्रामपंचायत सरपंच , ग्रामसेवक यांनी तात्काळ या कडे लक्ष देवून नागरीकांचे प्रश्न मार्गी लावावे . मांडवा गावातील हे अतिक्रमण हे कायमच राहील की ग्रामसेवक या प्रश्नाला मार्ग काढतील या कडे सर्व ग्रामस्थांचे लक्ष वेधले आहे .
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड