कळंब – दि. २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत भगवान प्रभू रामचंद्राची मूर्ती प्राणप्रतिष्ठा होणार आहे.या पवित्र व मंगल दिनाच्या निमित्ताने कळंब तालुक्यातील दारू व मांस विक्रीचे दुकाने बंद ठेवावीत अशी मागणी निवेदनाद्वारे वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र महिला शाखेच्या वतीने कळंब च्या तहसीलदार प्रियवंदा म्हाडदळकर व हनुमंत कांबळे सहायक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन कळंब यांच्याकडे करण्यात आली असून या प्रसंगी हे निवेदन देण्यासाठी ह .भ .प. सुनीतादेवी अडसूळ महाराज जिल्हाध्यक्ष वारकरी साहित्य परिषद महिला विभाग,सा.साक्षी पावनज्योत कायदेशीर सल्लागार अँड.शकुंतला फाटक,कीर्तीमला लोमटे ,महादेवी देशमुख, विजया पांचाळ ,प्रेरणा नागटिळक ,अशोक महाराज पवार ,दिगंबर गिरे ,संदीप कोकाटे ,भागवत शिंदे ,राजेंद्र जाधव ,उद्धवराव धस ,के. पी. अभंग ,सचिन वाघमारे ,राजेंद्र जाधव यांची उपस्थिती होती.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी