कळंब – दि. २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत भगवान प्रभू रामचंद्राची मूर्ती प्राणप्रतिष्ठा होणार आहे.या पवित्र व मंगल दिनाच्या निमित्ताने कळंब तालुक्यातील दारू व मांस विक्रीचे दुकाने बंद ठेवावीत अशी मागणी निवेदनाद्वारे वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र महिला शाखेच्या वतीने कळंब च्या तहसीलदार प्रियवंदा म्हाडदळकर व हनुमंत कांबळे सहायक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन कळंब यांच्याकडे करण्यात आली असून या प्रसंगी हे निवेदन देण्यासाठी ह .भ .प. सुनीतादेवी अडसूळ महाराज जिल्हाध्यक्ष वारकरी साहित्य परिषद महिला विभाग,सा.साक्षी पावनज्योत कायदेशीर सल्लागार अँड.शकुंतला फाटक,कीर्तीमला लोमटे ,महादेवी देशमुख, विजया पांचाळ ,प्रेरणा नागटिळक ,अशोक महाराज पवार ,दिगंबर गिरे ,संदीप कोकाटे ,भागवत शिंदे ,राजेंद्र जाधव ,उद्धवराव धस ,के. पी. अभंग ,सचिन वाघमारे ,राजेंद्र जाधव यांची उपस्थिती होती.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले