कळंब – दि. १२ डिसेंबर रोजी सोलापूर येथे संपन्न झालेल्या रिजनल अबॅकस स्पर्धेमध्ये ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक सुभाष लाटे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरातील १२ विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या स्पर्धेत राज्यातील तब्बल ९०० विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी केवळ ४० विद्यार्थ्यांची पुणे येथे होणाऱ्या नॅशनल अबॅकस कॉम्पिटिशनसाठी निवड झाली असून,त्यात विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरातील १२ विद्यार्थ्यांचा समावेश ही अभिमानास्पद बाब आहे.या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवर आपले गणितीय कौशल्य सादर करण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. या यशानिमित्त दि.२७ डिसेंबर २०२५ रोजी विद्यामंदिरात या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.संस्थेचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला.यावेळी नुकत्याच अमेरिकेत शैक्षणिक अभ्यासदौऱ्यावर जाऊन आलेबद्दल डॉ.मोहेकर यांचा देखील शाळेच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भागवत गव्हाणे, मुख्याध्यापक सुभाष लाटे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक गोविंदराज कल्याणकर यांनी तर आभार प्रदर्शन सहशिक्षक दयानंद बन्सर यांनी केले.या प्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड