धाराशिव (जिमाका) – धाराशिव जिल्हा प्रशासनातर्फे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस (१७ सप्टेंबर २०२५) ते महात्मा गांधी जयंती (०२ ऑक्टोबर २०२५) या कालावधीत राबविण्यात येणार असून,तीन टप्प्यात विविध उपक्रम राबविले जाणार आहे. ➡️ पहिला टप्पा (१७ ते २२ सप्टेंबर) – पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमणमुक्ती मोहीम ➡️ दुसरा टप्पा (२३ ते २७ सप्टेंबर) – ‘सर्वांसाठी घरे’ योजनेअंतर्गत पट्टा वाटप ➡️ तिसरा टप्पा (२८ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर) – शेतरस्ते मजबुतीकरण व जनता दरबार : जिल्ह्यातील नागरिकांनी या सेवा पंधरवड्यात सक्रिय सहभाग नोंदवून विकास प्रक्रियेत सहकार्य करावे.असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
More Stories
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक
दुखवट्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा मतदान दिवस बदलला;आता ७ फेब्रुवारीला मतदान