कळंब (अविनाश घोडके) – जिल्ह्यातील शेतकरी मतदार राजा ऊस बीलासाठी कारखान्यावर चकरा मारण्यात बेजार झाला असला तरी कारखानदार मात्र निवडणुकीत मशगुल झाला असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मुला- मुलीची लग्ने, घर बांधकामासह इतर स्वप्ने धुळीस मिळत आहेत. जानेवारीत गेलेल्या उसाची बिले एप्रिल संपत आला तरी अजून पर्यंत न मिळाल्याने ऊस उत्पादक शेतकरी चिंतातूर झाला आहे. शरद पवार राष्ट्रवादीचे धाराशिव जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर मात्र एकटेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या या समस्येवर साखर आयुक्त्याकडे मागणी लावून धरत असल्याचे दिसत आहे. निवडणुकीच्या तोंडावर कारखानदार पुढाऱ्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बीले तात्काळ देणे गरजेचे आहे. अन्यथा ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मताला मुकावे लागेल याचे भान कारखानदार पुढाऱ्यांनी ठेवावे अशी चर्चा ऐकायला मिळत आहे.
More Stories
तथागत बुद्ध विहार येथे रमाई जयंती उत्साहात साजरी
कल्पनानगर येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
कळंब शहरात स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी नगराध्यक्ष कापसे पहाटेच उतरल्या रस्त्यावर